शुक्रवारी माझ्या प्रिय मैत्रीण मेधावी Medhavi Joshi-Bajiraoमुळे आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आणि माझी १० वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली. वर सोने पे सुहागा असा काय म्हणतात तसं , हा कार्यक्रम पाहायला माझ्या सर्वात जवळच्या अशा ४ व्यक्ती सोबत होत्या. टंकसाळे काकू(मातृ स्वरूप Pratibha Tanksale), नमिता (पिल्लू स्वरूप Namita Kulkarni), मंगेश (साक्षात अहो Mangesh Vazarkar) आणि कविता(माझी जीवश्च कंठश्च सखी Kavita Patil ).
'सांग सख्या रे.. आहे का ती.. अजून .. तैशीच.. गर्द राईपरी '
संदीप खरेंची Sandeep Khare पहिली मी ऐकलेली कविता.. त्याच्या 'तिच्या'साठी लिहिलेल्या 'ति'च्या (कविताच नक्की) प्रेमात मी पडले आणि मग त्याचा असंख्य त्या (पुन्हा कविताच..)माझ्या मैत्रिणी होत गेल्या.
संदीप खरेंची Sandeep Khare पहिली मी ऐकलेली कविता.. त्याच्या 'तिच्या'साठी लिहिलेल्या 'ति'च्या (कविताच नक्की) प्रेमात मी पडले आणि मग त्याचा असंख्य त्या (पुन्हा कविताच..)माझ्या मैत्रिणी होत गेल्या.
सरळ, सहज शब्दात सुरु होणार आशय .. लगेच लक्षात राहील अशी शब्दरचना .. अरे कित्ती सोपा आहे अशी कविता लिहिणं असा वाटत असतानाच शेवटच्या काही ओळींमधून कधी जीवघेणा वास्तव, तर कधी हृदय पिळवटून टाकणारी वेदना समोर येते आणि आपण विस्मयचकित होऊन त्या शब्दांच्या मोहिनी मध्ये असे खेचले जातो कि भानच राहत नाही कि आपण कविताच ऐकत होतो.
कधी आपलीच कुठलीतरी मनाच्या खोल खोल तळाशी कोंडून ठेवलेली दुखरी आठवण समोर आणावी , तर कधी गोड गुलाबी क्षणांच्या राज्यात फिरवून आणावं, कधी पडद्याआड दडलेल्या वास्तवाचं दर्शन अगदी नेमकेपणाने घडावं तर कधी रोजच्या रहाटगाड्यात निवांत क्षण देऊन थकल्या भागल्या मनाला सुखवावं अशी अनोखी कविता फक्त संदीप खरेच लिहू शकतात.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात Yashwantrao Chavan Natyagruha 'चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही' #ChalaDostahoAyushyavarBoluKahi चा सुरांसोबत जेव्हा पडदा हळू हळू सरकत गेला तेव्हाच आपण एका अनोख्या जगाची सफर करणार आहोत असा आभास निर्माण झाला. त्यानंतर शब्द, सूर, हास्यविनोद, टाळ्या, शिट्ट्या फर्माइशींची अशी जोरदार बरसात होत गेली. कुणी म्हणताय 'जा दिले मन तुला' .. तर कुणी म्हणताय 'नामंजूर '.. कुणाला 'मोर्चा ' हवाय तर कुणाला 'लव्ह लेटर '. फर्माइशींची अशी जुगलबंदी जमत गेली कि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखत नसू कदाचित.. पण अवघडलेपणा राहिलाच नाही कुठे.. आपल्याच यार दोस्तांसोबत गप्पांचा फड रंगवलाय असा वातावरण तयार झालं.. खरंच इतकी जादू आहे संदीप खरेंच्या कवितांमध्ये आणि सलील कुलकर्णींच्या Saleel Kulkarni Official सुरांमध्ये कि त्या शुक्रवारच्या संध्याकाळनंतर आलेली शनिवार आणि रविवार ची सुट्टीपण त्या कवितांच्या ओळी गुणगुणत वेगळ्याच आनंदलहरींनी भारून राहिली.
- कल्याणी
२७-११-२०१७
सायंकाळी ६:३०
- कल्याणी
२७-११-२०१७
सायंकाळी ६:३०
No comments:
Post a Comment