Tuesday 28 November 2017

सत्य कि परीकथा

रामाला बहिण होती, शांता नावाची जिला दशरथाने अंग राज्यात दत्तक दिली होती, का? तर त्याला सांगण्यात आलं होतं कि तिने एका
ऋषीपुत्राची तपस्या भंग करून त्याचाशी विवाह करावा आणि त्याला अयोध्येत आणून दशरथाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ करावा.
आणि हो मंथरा दासी मानाने चांगली होती बर का.. ती या शांतेचं सांभाळ करायची आणि शांते सोबत असं सगळं राजाने केलं त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी तिने कट कारस्थाने करून रामायण घडवलं.

सीता हे रावणाची एका ब्राह्मण स्त्री कडून झालेली अनौरस मुलगी होती आणि तीच त्याच्या विनाशाचे कारण बनेल हे कुणीतरी सांगितल्यामुळे तिला टाकून देण्यात आली आणि मग ती शिकारीवर गेलेल्या जनकाला सापडली' आणि जानकी झाली. मग पुढे तोच रावण तिला (आपल्या मुलीला) पळवून घेऊन गेला.

वाचून धक्का बसला ?? मला तरी माहित नव्हते बुवा हे सगळे. अशातच काही पुस्तकांमधून वाचले. गेल्या वर्षात अशी बरीच पुस्तके प्रकाशित झाली आणि माझ्या वाचनात आली. आनंद निलकंठण ची Asura- The tell of Ravana, आमिष त्रिपाठीचे Shiva Trilogy, आणि Rama Trilogy हि काही उदाहरणे. मोठी गम्मत वाटते मला या पुस्तकांची. जे वाईट ते वाईटच.. असे मानून चालणारे आपण.. पण ते का तसे? असे प्रश्न आपल्याला पडतच नाहीत. हि पुस्तके वाचून एक नवाच आयाम मिळतो लहानपणापासून ऐकत आलेल्या रामायण महाभारत आणि अशा अनेक गोष्टींना.

आता खरं सांगायचं तर या पुस्तकांवरती अगदी दोन विरोधी टोकाच्या प्रतिक्रिया मिळतात. काही जणांना हे पटतच नाही कि आपल्या पुराण कथांमधल्या  so called Negative पात्रांची काहीतरी bright side पण असू शकते. तर काही माझ्यासारख्या fantasy loving लोकांना त्या शक्यता अगदी भारावून टाकतात आणि काही ठिकाणी तर अमृत, विष, असुर, देव या सगळ्या आपण कधीही न पाहिलेल्या गोष्टींची खूपच शास्त्रशुद्ध संकल्पना मांडली आहे या पुस्तकांमधून. लेखकाने आपली कल्पनाशक्ती वापर्लीये कि खरच खूप अभ्यास करून सत्यता मांडलीये याचा माग काढण्याची मला तरी गरज वाटत नाही. पूर्वग्रहदुषित न राहता सारासार विचार केला तर पटतात पण या गोष्टी.


असो.. वादात पडण्यापेक्षा मी तरी आपली हे पुस्तके वाचून पटलं तर  truth नाही तर fantasy समजून निखळ वाचनानंद मिळविणे पसंत करते.

-कल्याणी
२८-११-२०१७
रात्री ११.३५

No comments:

Post a Comment