जवळपास एका वर्षानंतर काहीतरी लिहिलंय. जरा अपक्व वाटेल पण गोड मानून घ्या.
कविता बहिणाबाईंच्या "मन वढाय वढाय" च्या धाटणी ची आहे. ओवी प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न केलाय. चुका असतील तर नक्की दाखवा .
------------------------------------------------------------------------------------------------------
मन बेभान बेभान , उगा विचलित होई ।
सातासमुद्रापल्याड, दूर देशामध्ये जाई ।।
अरे थांब रे रे मना , नको जाऊ असा दूर ।
डोळ्यातून बरसेल, पाऊस तो झरझर ।।
कशी आवरू रे त्याला, किती विनवणी केली ।
दूर देशी रे साजन , मना ओढ ती लागली ।।
- कल्याणी
०५-०८-२०१४
पहाटे १:१५
कविता बहिणाबाईंच्या "मन वढाय वढाय" च्या धाटणी ची आहे. ओवी प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न केलाय. चुका असतील तर नक्की दाखवा .
------------------------------------------------------------------------------------------------------
मन बेभान बेभान , उगा विचलित होई ।
सातासमुद्रापल्याड, दूर देशामध्ये जाई ।।
अरे थांब रे रे मना , नको जाऊ असा दूर ।
डोळ्यातून बरसेल, पाऊस तो झरझर ।।
कशी आवरू रे त्याला, किती विनवणी केली ।
दूर देशी रे साजन , मना ओढ ती लागली ।।
- कल्याणी
०५-०८-२०१४
पहाटे १:१५
No comments:
Post a Comment