"रुपमहाल" नंतर थांबावस वाटत नव्हतं म्हणून "मधुमती" हि वाचायला घेतला आणि एका वेगळ्याच जगात प्रवास करून आल्याचा आनंद पुन्हा अनुभवला.
म्हणून हा लेखनप्रपंच.
मधुमती
नायकीनि या केवळ शौकीन लोकांना मोहित करून त्यंच्या पैशांवर ताबा मिळवून छान-छोकीत राहणाऱ्या किंवा एक तर रंगेल किंवा कलासक्त राजाच्या दरबारी "सेवेस" स्त्रिया असतात हा जनापवाद स्पष्टपणे खोडून काढणारी हि कथावली.
एवढ्या नजाकतीने प्रत्येक कथेतली सौन्दर्यवती वर्णिली गेली आहे कि वाचता वाचता ती साक्षात पुढे उभी असल्याचा भास होतो.
या शृंगारिक वर्णनासोबतच यातल्या प्रत्येक कथेला एका वेगळ्याच नाट्याची झालर आहे.
कधी कुणा वारांगानेला पित्याच्या प्रेमाची झलक दाखवून जाणारा कुणी प्रवासी भेटतो, कधी कुणा "स्त्री हे केवळ उपभोगाचे साधन" असे मानणाऱ्या गर्भश्रीमंत दलालाचे स्त्रीत्वाच्या तेजस्वी सात्त्विकतेचे दर्शन देऊन डोळे उघडणारी कुणी युवती भेटते.
शेवटी लेखकाच्याच भाषेत सांगावस वाटत..
"समेवर येता येता प्रत्येक कथा वाचकाची 'हो' मिळवूनच थांबते."
"समेवर येता येता प्रत्येक कथा वाचकाची 'हो' मिळवूनच थांबते."
~~* कल्याणी *~~
No comments:
Post a Comment